राजकीय

भाजप महायुती ला महाराष्ट्राच्या सत्तासिंहासनावर पुन्हा बसविण्याची ताकद माझ्या रिपब्लिकन पक्षात —- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

मुंबई  दि. 06 –  राज्यासह देशभरात रिपाइं कार्यकर्त्यांची फार मोठी ताकद असुन भाजपाला सत्तेत येण्यासाठी रिपाइंच्या ताकदीची गरज आहे. येणा-या विधानसभेत भाजपाने रिपाइंला 11 जागेवर वाटा देण्याचे काम करावे. भाजप महायुतीला पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तासिंहसनावर बसविण्याची ताकद माझ्या रिपब्लिकन पक्षाची आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
तसेच राखीव मतदार संघातील जागेवर रिपाइंचा हक्क असून केजची जागा देखील रिपाइंच्या हक्काची आहे. भाजप ने केज ची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडल्यास पप्पू कागदे यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देऊ असे यावेळी  ना. रामदास आठवले यांनी बीड येथे जाहीर केले.
बिड जिल्हा रिपाइंच्या वतीने युवक आघाडी चे  प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, यांच्या नेतृत्वात बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रिंडागणावर रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांचा भव्य- दिव्य सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळयातस उत्तर देताना ना.रामदास आठवले बोलत होते.

ना. रामदास आठवले म्हणाले की, मी केंद्रात तिस-यांदा मंत्री झाल्यामुळे माझे राज्यभर अनेक सत्कार सोहळे झाले. परंतु बीड जिल्हयाचे  पप्पु कागदे यांनी माझा सत्कार सोहळा भव्य दिव्य केला. बौध्द, मातंग ,चर्मकार, मराठा, मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम करणारे आम्ही आहोत. संविधानासाठी गोरगरीब समाजासाठी व उपाशी पोटी राहणा-या माणसांसाठी आम्ही काम करणारी माणसे आहोत. दलित पँथरपासुन बीड जिल्हा माझा बालेकिल्ला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही माझी मागणी दलित पँथरपासुन आहे. मंडल आयोग लागु करण्यासाठी संघर्ष करण्याचे काम मी पॅथरच्या माध्यमातुन केले आहे. नामांतराच्या लढयात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. भाजपाने रिपाइंच्या राज्यभरातील ताकदीचा विचार करुन भाजपाने आम्हाला सत्तेत वाटा दिला पाहिजे. भाजपला सत्तेत यायचे असेल तर रिपाइंला 11 जागा देऊन त्यात केज मतदार संघाची जागा द्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी  दिवंगत विनायकराव मेटे यांनी सदैव संघर्ष केला. बीड जिल्हयात आल्यावर गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पप्पु कागदे सारख्या देशभरातील कार्यकर्त्यांची  माझ्या पाठीशी ताकद आहे. त्यामुळे केज चा रिपब्लिकन पक्षाचा आमदार करण्यासाठी मी ताकद लावणार आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. 

या भव्य सत्कार सोहळयाचे स्वागताध्यक्ष युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे म्हणाले की, दिन दलित, शोषित, पिडीत, उपेक्षितांना न्याय देण्याचे काम ना. रामदास आठवले दलित पँथरपासुन करीत आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडळ आयोगाचा लढा उभा केला. ओबीसींना न्याय देण्याचे काम रिपाइंच्या माध्यमातुन करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका रिपब्लिकन पक्षाची आहे. 

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचा बीड शहरात शनिवारी ऐतिहासीक सत्कार सोहळा पार पडला. सोहळयापूर्वी राजुरीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य – दिव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी निळया वादळाचे शक्ती प्रदर्शन केले. युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या तगडया नियोजनातुन ना. रामदास आठवले यांचा बीड येथील भव्य दिव्य सोहळा ऐतिहासीक ठरला आहे. 

Star Maharashtra

Star Maharashtra या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकूर, बातम्या, जाहिराती, व्हिडिओ, फोटो यातील मतांशी संपादक / वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!